आमच्या बद्दल


भगूर  शहर माहिती 

भारतीय स्वातंत्र्यसै धन्यवाद!निक,राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी  व लेखक तसेच


“आसिंधु सिंधु पर्यन्त,यस्य भारतभुमिका ॥

पित्रुभू: पुन्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृत:॥
सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे, हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जन्मभुमी असलेले भगूर शहर. भगूर शहर हे नाशिक जिल्ह्यात असुन जे की  संपुर्ण भारताचे तीर्थक्षेत्र म्हणुन ओळख आहे. 
भगूर शहर हे दारणा नदी तिरावर वसलेले असुन जी नदी भारताची दक्षिणगंगा म्हणुन ओळखल्या जाणा-या  गोदावरी नदीची उपनदी आहे.
भगूर शहराचा इतिहास हा महर्षि भृगु ऋषि या गौरवशाली इतिहासाशी संबंधित असुन, भृगु ऋषि हे ब्रम्हा चे पुत्र होते, अशी  अख्यायिका आहे. ज्यांनी महान ज्योतिष ग्रंथ “भृगु संहिता” ची रचना केली.
भृगु ऋषिंनी दंडकारण्यातील ज्या परिसरात साधना केली व गुरुकुल उभारले त्या परिसराला भगूर म्हणून ओळखले जाऊ  लागले. भृगु ऋषिंनी ऋग्वेद, अथर्ववेद, भृगु आयूर्वेदसंहिता, भृगुस्मृती, भृगु गीता आदि ग्रंथ लिहिले, अशी अख्यायिका आहे.
भृगु ऋषिंमुळे भगुरला भार्गव असे नाव पडले व नंतर भगूर झाले. 
नंतरच्या काळात भगूर ओळखले जावू लागले ते सावरकर कुटुंबियामुळे. सावरकर व त्याच्या लढवया सहका-यांमुळे स्वातंत्र्य चळवळीत भगूरमध्ये नेहमीच इंग्रज पोलिसांचा बंदोबस्त असल्याने गाव  नेहमीच छावणी वाटायची.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे घर राष्ट्रीय स्मारक झाले आहे. भगूरमध्ये सावरकरांच्या नावे उद्यानही आहे. जवळच सावरकर चौथीपर्यंत शिकले ती शाळा आहे. येथून जवळच भगूरच्या प्रसिद्ध रेणूका देवीचे मंदिर आहे. गावातील राम मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर पाहण्यासारखे आहे.
भगूर प्राचीन काळापासुन ज्ञान, धन, तपस्या व लढवय्यांची खाण  होती हे स्पष्ट होते.
अशा या ऐतिहासिक, राजकीय, स्वातंत्र्यलढा, पौराणिक वारसा असलेल्या भगूर शहराची नगरपरिषद स्थापना १ ऑक्टोबर, १९२५ रोजी झाली. या शहराची सन २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या १२३५३ आहे .
भौगोलिकदृष्ट्या भगूर शहराची माहिती घेतल्यास शहराचे क्षेत्रफळ ०.६७ चौकीमी असुन उत्तरेस मुंबई – भुसावळ मध्य रेल्वेची रेल्वेलाईन आहे. शहराच्या उत्तरेस कॅन्टोनमेंट ही लष्करछावणी आहे.
भगूर शहरास शासन स्तरावरील संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विभाग स्तरावरील प्रथम व राज्य स्तरावरील द्वितीय अशा प्रकारचे अनेक पुरस्कार मिळविण्यात शहर यशस्वी झालेले आहे.
अशा प्रकारे भगूर हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असुन भौगोलिकदृष्ट्या हिरवेगार टेकड्या, निसर्गरम्य व अल्हाददायक वातावरण असलेले शहर आहे.  
                                                                                                            धन्यवाद..